पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, २४ जून रोजी श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम सकाळी ११:०० वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणार आहे, जिथे पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील.
भारतातील दोन सर्वात आदरणीय आध्यात्मिक आणि नैतिक नेत्यांमधील ऐतिहासिक संवादाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. मूळ संवाद १२ मार्च १९२५ रोजी महात्मा गांधींच्या भेटीदरम्यान शिवगिरी मठात झाला होता. त्यांच्या संवादात वैकोम सत्याग्रह, धार्मिक धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता निर्मूलन, मोक्षाचा मार्ग आणि दलितांचे उत्थान यासारख्या तत्कालीन प्रमुख सामाजिक आणि नैतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती.
शिवगिरी मठाचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री नारायण धर्म संघम ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारताच्या सामाजिक आणि नैतिक परिदृश्यावर प्रभाव पाडणाऱ्या या संवादाच्या महत्त्वावर चिंतन करण्यासाठी आध्यात्मिक नेते, विद्वान आणि समाजसुधारकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे.
