1 नाशिकच्या पालकमंत्री पदावर अधिकारने एकच व्यक्ती दावा करू शकत होते आणि ते म्हणजे छगन भुजबळ. पण त्यांच्या मंत्रीपदालाच अडसर आणला गेला. मग पालकमंत्रीपदाचा विषयच संपला. 2 नाशिक शहरातील एकाही आमदारास मंत्री नाही केलं तिथे ही स्पर्धा संपली. 3 एकनाथ शिंदेंची बर्गीनिंग पावर अजित पवारांच्याकडून कमी करून घेतली. तेथेच दादा भुसेंच पालकमंत्री पद गेलं. 4 कोकाटे नव्यानेच मंत्री झाले त्यांचा विषयच नाही 5 त्यात अजित पवार मुंडेंमुळे कात्रीत तेथेही सुरेश धस मागे लागलेले ते BJP चेच. ही सगळी समीकरणे BJP चा नाशिकला पालकमंत्री देण्याच्या पथ्याची. नी ती जुळविल्या गेली हा प्रश्न पडतो ? नी कुणी जुळवली ? हा ही. पण का जुळवली हे सांगणे सोपे. 2027 चा सिंहस्थ कुंभमेळा. ज्यात केंद्र व राज्य शासनाचा निधी समुद्रा एवढा नाशिकला येणार आहे. त्याचसाठी हा आटापिटा. आत्ता या निधीची विल्हेवाट लागते की वाट हे 2028 लाच कळेल. पण या मागे उदेश एकच अशा ठिकाणी आपला विश्वासातील माणूस हवा म्हणून गिरीश महाजन.
